मुंबई: राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारण्यात आले असून त्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या वीज आकारणीला तात्काळ चाप लावा. महावितरण, बेस्टसह खासगी वीज कंपन्यांना समज द्या, अन्यथा या वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असं सांगतानाच करोना असला तरी अशा विषयात मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत करून घेऊ नका, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला आहे.